5 सर्वोत्तम मराठी बोधकथा । 5 Best Moral Stories in Marathi
मित्रांनो आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सर्वांना सुट्ट्या लागल्या असतील त्यामुळे सर्वजण मोबाईल मध्ये गोष्टी ऐकत असतील तुम्ही देखील गोष्टींच्या शोधात असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल कारण की यामध्ये मी पाच ते सहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या देखील तात्पर्यासोबत सांगितले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.
१. मराठी बोधकथा: गाडी भरून बदाम
एक खारुताई जंगलाचा राजा सिंह यांच्या सेवेत होती अगदी मनापासून आपले कर्तव्य बजवायची ती सुरुवातीला इतर खारींना सोडून राजाने आपली निवड केली याचा तिला अभिमान वाटायचा त्यामुळे ती अगदी मन लावून आणि तत्परतेने सांगितलेले काम करत असे पण हळूहळू तिला या कामाचा कंटाळा येऊ लागला तिला इतर खारींसारखे मोकळेपणाने वावरता येत नव्हतं जरा इकडे तिकडे गेले की राजा सिंह लगेच तिला बोलावून घेत असे तिचा कंटाळा राजाच्या नजरेतून सुटला नाही त्याने तिला बोलावले.
सांगितले की तू जर माझी योग्य तरीने सेवा केलीस तर तू रिटायर होशील तेव्हा गाडी भरून बादाम मी तुला देईन खारुताई फरकली सगळा आळस आणि कंटाळा बाजूला सारून उमेदवार लागले तिच्या मनात आले आता मला कष्ट करावे लागतात पण जेव्हा माझ्याकडे गाडी भरून बदाम येतील तेव्हा सगळ्या खारींना माझा हेवा वाटेल. आणि काही दिवसात खारू ताई म्हातारी झाली आणि रिटायर व्हायची वेळ आली सिंहाने तिला तिच्या सेवेतून खुश होऊन गाडी भरून बदाम दिले त्याची वचन पाळली खारुताईने या दिवसाच्या आयुष्यभर वाट पाहिली होती पण तिने जेव्हा ते बदाम पाहून आणखी दुःखी झाले आता तिला या बदामाचे काहीही उपयोग नव्हता कारण ते खाण्या साठी तिच्याकडे दातच उरले नव्हते.
मराठी बोधकथा तात्पर्य: आयुष्यात कोणतीही गोष्ट वेळेच्या वेळी मिळाली तरच उपयुक्त ठरते.
२. मराठी बोधकथा : सर्वात प्रिय
एका घुबडाने गरोदरडाचे उपकाराची परतफेड म्हणून एका घुबडाणीला तिची पिल्ले न खाण्याचे वचन दिले होते पण तुला माझी पिल्लू ओळखता येतील का,घुबडाने विचारले . नाहीतर तुझी गलत होईल ठीक आहे तू वर्णन करून सांग म्हणजे माझी फसगत होणार नाही ,गरुड म्हणाला.
छे छे मला खात्री आहे की माझी पिल्लू इतरांपेक्षा खूपच वेगळी आहेत सांगताना घुबडाची छाती गर्वाने भरून आली होती ती खूपच मुलायम गुबगुबीत व अतिशय सुंदर आहेत एके दिवशी गरुड एका घटाजवळ आला त्यात कर्कश आवाज करणारी नुकतेच पंख फुटलेली आव असून आपली लाल लाल तोंड दाखवणारी पिल्ले दिसली तो थांबून विचार करू लागला ही नक्कीच घुबडाची पिल्लं नसणार कारण तिने सांगितलं होतं की तिची पिल्लं खूपच सुंदर आहेत म्हणून पण ही तर एकदम बेसूर दिसतात सेकंदाचाही विचार न करता त्याने त्या पिल्लावर झडप घालून त्यांना फस्ट करून टाकली परत आल्यावर तिने आपले घरटे रिकामे दिसले गुरुदाने आपले वचन पाळले नाही तरी मी सांगितलं होतं की माझी पिल्लू फारच सुंदर आहेत म्हणून आणि तिचा आक्रोश सुरू झाला.
मराठी बोधकथा तात्पर्य: प्रत्येक आईला आपले मूल सुंदर आहे असेच वाटते.
३. मराठी बोधकथा : परीस (पारस)
एक माणूस पारस शोधायला निघाला त्याच्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा गळ्यातल्या साखळी ला लावायचा आणि फेकून द्यायचा असं त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेली महिने लोडले वर्ष सरली पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही दगड घ्यायचा साखरेला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा शेवटी तो माणूस म्हातारा झाला आणि ज्या क्षणी तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले ती साखळी सोन्याची झाली होती दगड घ्यायचा साखरेला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात साखळी कडे लक्ष गेले नाही.
मराठी बोधकथा तात्पर्य: प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परिस येत असतो कधी आई-वडिलांच्या रूपाने तर कधी भावा बहिणीच्या नात्याने तर कधी मित्र मैत्रिणींच्या नात्याने तर कधी प्रियसीच्या नात्याने कोणत्या ना कोणत्या रूपात तो आल्यावर भेटत असतो आणि आपल्याला लोखंडाचे सोने करीत असतो आपण जे काही असतो किंवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो पण फार कमी लोक या परिराला ओळखू शकत नाही.
४. मराठी बोधकथा : गरुड पक्षी आणि मनुष्य
एका मनुष्याने जाळ्यात एक गरुड पक्षी पकडला व त्याचे पंख कापून त्याच साखळीने एका खांबास बांधून ठेवले शेजारी दुसरा एक शिकारी मनुष्य राहत असे त्याच त्या पक्षाचे ते हाल पाहून त्याची दया आली मग त्याने पैसे भरून तो गरुड विकत घेतला आणि त्याचा चांगला प्रतिपाळ केला पुढे त्या पक्षाचे पंख वाढल्यावर त्याने त्यास सोडून दिले गरुडाने उंच भरारी मारली आणि रानात जाऊन एका ससा पकडून तो त्या माणसास कृतज्ञेचे चिन्ह म्हणून आणून दिला.
तिकडून एक कोल्हा चालला होता त्याने तो प्रकार पाहून गरुडास म्हटले गड्या मी जर तुझ्या जागी असतो तर हा ससा मी त्या पहिल्या माणसास नेऊन दिला असता कारण त्याच्यापासून आपणास वय आहे त्याच्याशी मैत्री करावी आणि ते भय टाळावे हा शहाणपणा होईल त्या माणसाने तुला सोडून तुझा प्रतिपाळ केला त्याच्यापासून तुला तसदी पोहोचवण्याचा संभव नाही पण ज्याने तुला पहिल्याने पकडून बांधून ठेवले होते त्याच्याकडून मात्र तुला पुन्हा त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून हा ससा त्यास देऊन त्याच्याशी मैत्री करणे अधिक शहाणपणाचे झाले असते त्यावर गरुड म्हणाला गड्या हा तुझा उपदेश कोल्ह्याला शोभण्यासारखाच आहे पण माझे मत विचारशील तर ज्याने आपल्यावर दया केली त्याला कृतज्ञता दाखवावी व त्यांच्यापासून आपणास उपद्रव होण्यास संभव आहे त्यांच्याशी सावधगिरीने वागावे हेच खरे शहाणपण होय असे मला वाटते.
मराठी बोधकथा तात्पर्य : जो थोर आहे त्यांच्याशी थोराप्रमाणेच वागले पाहिजे मग त्यांच्यापासून आपणास त्रास पोहोचवण्याचा संभव असो वा नसो.
५. मराठी बोधकथा: पहिला चहा
संध्याकाळची वेळ शाळा सुटल्या मुलं घरी गेले थोडावेळ टीव्ही समोर बसून त्यांनी कार्टून बघितलं ते बघता बघता त्यांनी खाणं पिणं ओळखलं मग ग्राउंड वर जाण्यासाठी बाहेर आली ग्राउंड जवळच होते सर्वात आधी पोहोचला तो नितीन. त्याने एका जागी उभे राहून सर्व ग्राउंड वर नजर फिरवली मुलांचे वेगवेगळे गट ग्राउंड वर खेळत होते एक होता नरेंद्रचा गट तो जोरात क्रिकेट खेळत होता त्यांच्या ग्राउंड वर नरेंद्राच्या टीमचा दबदबा होता.
इतरही टीम्स जागा मिळेल तिथे खेळत होता एका मुलीचा गट जयाचा गट म्हणून ओळखला जाणारा एका कोपऱ्यात खेळत होता एका कोपऱ्यात नवीन नामक मुलांचा गट खेळत होता नितीन सर्व ग्राउंड वरून नजर फिरवली त्याच्या मनात आलं आपणही आपले गट निर्माण केला पाहिजे त्याने मोबाईलवर मित्रांना म्हणलं या ग्राउंड वर येताना खेळासाठी काहीतरी सामान घेऊन या सगळीकडे आपापले संघ घेऊन वेगवेगळे मुलं खेळतात आपणही खेळूया मित्र आले लालू आला शरद आला मुलायमही आला नितीन म्हणाला आपण चौघे जमलो आणखी दोघांना बोलवू या का?
कोणा कोणाला?
आपला देवेगौडा त्याला बोलूया त्याला बोलवूनच पण त्यात चौटालालाही हाक मारू ते दोघेही आले.
अजय फारुख नायडू यांनाही बोलावूया का? लालू ने विचारले.
नको सध्या आपण एवढेच जमून संघ बनवूया.
संघ बनला.
नाव ?
जनता ओ म्हणजे ओरिजनल ओ. के. सगळे उद्गारले खेळ सुरू झाला.
थोडा वेळ उत्साहाने खेळ झाला सर्वांना वाटला आपण सर्वश्रेष्ठ संघ ठरणार त्या नरेंद्रच्या टीमला नक्की ग्राउंड बाहेर घालून देणार सगळे जोमाने खेळू लागले पण काय करणार त्याचे आपापसात वादच झाले.
स्वभाव दुरतीक्रमा
सगळे जोरजोरात एकमेकांशी भांडले आपापले सामान घेऊन तिथून निघून गेले जमलेले प्रेक्षक म्हणाले 'शेवटी सगळेच आपापल्या वाटेने गेले झाल'.
मित्रांनो मी अपेक्षा करते की या बोधकथा तुम्हाला आवडले असतील आणि जर तुम्हाला या बोधकथा आवडले असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते
धन्यवाद
5 सर्वोत्तम मराठी बोधकथा । 5 Best Moral Stories in Marathi
- moral stories in marathi
- bodh katha moral stories in marathi
- short moral stories in marathi
- top 10 moral stories in marathi
- good moral stories in marathi
- moral stories in marathi for class 9
- moral stories in marathi for class 6
- short stories book marathi